आनंदवाडी येथे वर्षावास निमित्त धम्म प्रवचन संपन्न.

वेंगुर्ला.
सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ तालुका शाखा वेंगुर्ला यांच्या विद्यमाने १८ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला आनंदवाडी येथे वर्षावास निमित्त धम्म प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते.यावेळी आदरणीय धम्मचारी जिनचित्त व आदरणीय धम्मचारी अमृतसागर वर्षावास कार्यक्रमा निमित्त आयोजित प्रवचनासाठी उपस्थित होते.
यावेळी धम्मचारी जिनचित्त यांनी प्रवचन देताना असे सांगितले की वर्षावासात जसे आपण एकत्र येऊन पूजा वंदना, ग्रंथपठण अशा प्रकारचे उपक्रम करत असतो त्याचप्रमाणे इतरही वेळी सतत एकत्र आलं पाहिजे व अशा प्रकारचे उपक्रम घेतले पाहिजे त्यामुळे आपल्यामध्ये धार्मिक ऊर्जा निर्माण होत असते. घटिका कुंभाराचा प्रसंग सांगून घटिका कुंभार कसा दानी होता हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आपणही दानशूर माणूस बनले पाहिजे पण एका हाताने दिलेले दानाची दुसऱ्या हाताला चाहूल लागू देवू नये अशा प्रकारे मनात किंतु न ठेवता आपण दान दिले पाहिजे.श्रावण पौर्णिमेचा महत्त्व सांगत असताना अंगुलीमालाची धम्मदीक्षा कशी झाली याचं वर्णन सविस्तर केले.अहिंसकाचा अंगुलीमाल कसा झाला व बुद्धांच्या संपर्कात आल्यानंतर बुद्धांना शरण आला या प्रसंगाचे वर्णन केले.
पुढे बोलताना आदरणीय जिनचित्त असे म्हणाले की आपण आपल्या कर्माचे रक्षण केलं पाहिजे. आपल्या कर्मामुळे आपल्याला चांगल्या वाईटाची प्रचिती मिळत असते. कर्म कुशल होण्यासाठी सतत शील आचरणात आणले पाहिजे तरच आपण आपल्या चित्ताचे रक्षण करू शकतो असे यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.यांनतर धम्मचारी अमृतसागर यांनी पूजा पाठाचा कार्यक्रम घेतला.यानंतर धम्म प्रवचनकार धम्मचारी जिनचित्त,धम्मचारी अमृतसागर, बौद्ध उपासक अमोल पावसकर यांचे सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ तालुका शाखा वेंगुर्लाच्या वतीने स्वागत करण्यात आले व मैत्री गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ तालुका शाखा वेंगुर्ला अध्यक्ष प्रेमानंद जाधव,उपाध्यक्ष गजानन जाधव, सचिव जयंत जाधव, कार्याध्यक्ष विठ्ठल जाधव, वाय.जी.कदम बौद्ध उपासक गौतम जाधव, अमोल जाधव, बौद्ध उपासिका गीतांजली जाधव, अवनी जाधव, मोनाली जाधव, दलित सेवा मंडळ अध्यक्ष सुहास जाधव, उपाध्यक्ष सखाराम जाधव, सुरेश जाधव, वामन कांबळे, सुभाष जाधव, गंगाराम जाधव, प्रदीप जाधव, महेंद्र जाधव, राजन कांबळे, अक्षय जाधव, महेश जाधव, प्रज्ञेश जाधव, विनय जाधव, सुधीर पालकर, वृषाली जाधव, सरोजिनी जाधव, दर्शना जाधव, देवयानी जाधव, छाया सागर, मानसी जाधव, रेणुका जाधव तसेच धम्म बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अमोल जाधव यांनी केले तर आभार सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई तालुका शाखा वेंगुर्ला अध्यक्ष प्रेमानंद जाधव यांनी मानले.