परुळे बाजार बॉईज ग्रुपच्या वतीने कृषीदिन साजरा.

वेंगुर्ला.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे राज्य कृषी दिनाचे औचित्य साधून आणि पर्यावरणाची गरज ओळखून परुळे येथील येसु आका येथील सड्यावर बाजार बॉईज ग्रुप परुळे बाजार या सदस्यांनी यावर्षी 100 झाडे लावून त्यांची काळजी घेऊन जगविण्याचासंकल्प केला आहे.आणि त्या दृष्टीने रविवार दिनांक 30 जून रोजी सुरुवातीला वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, अर्जुन अशीझाडे लावून पहिलं पाऊल टाकल.जागतिक तापमान वाढ,पर्यावरणाचा असमतोल, जमिनीची धूप आणि पाण्याचा वाढतातुटवडा अशा अनेक समस्या आज आपल्या समोर आहेत. आजआपण झाडे लावली तर येणाऱ्या पिढीला या समस्यांचा सामना करावा लागणार नाही. सृष्टी देसाई सारख्या 6 वर्षांच्या मुलीला जर या वयात वृक्षारोपणाच महत्त्व समजल, तर निश्चितच ती दरवर्षी उत्साहाने या मोहिमेत सहभाग घेईल. आणि तिचा उत्साह खरोखरच वाखणण्याजोगा होता. थोडक्यात या निसर्गाचं आपण देणंलागतो आज आपण झाडं लावली तर ती आपल्याला सावली देतील, फळं देतील मुख्य म्हणजे प्राणवायू देऊन नवीन जीवन देतील हे आजच्या ह्या नव्या पिढीला या वयात समजल तरी आपली जबाबदारी लक्षात घेऊन दरवर्षी जास्तीत जास्त झाडे लावा व ती जगविण्याचा संकल्प केला या मोहिमेत बाजार बॉईज ग्रुपच्या टीमने सहभाग घेतला.