तिलारी धरणातून २४ जुलैपासून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग....नागरिकांनी सतर्क रहावे
दोडामार्ग
तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे २४ जुलै २०२६ पासून नियमानुसार अतिरिक्त पाणी तिलारी नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे व अन्य साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
konkansamwad 
