सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आवाहन.

सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आवाहन.

सिंधुदुर्गनगरी. 

   वेंगुर्ले व सावंतवाडी तालुक्यात घडलेल्या प्रकारानंतर जिल्ह्यात शांतता राहावी यासाठी पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना आवाहन केले आहे.जिल्ह्यात जातीय सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करा,धार्मिक तेढ निर्माण होईल अशी कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करू नका,असे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सांगितले.दरम्यान अशा प्रकारे २ धर्मात वाद निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर पोलीस प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे कारवाईला बळी पडू नका असा ही इशारा त्यांनी दिला आहे.