वैभववाडी येथे भाजपा किसान मोर्चाच्या वतीने गोमाता पुजन व नैसर्गिक शेती परिसंवाद

वैभववाडी येथे भाजपा किसान मोर्चाच्या वतीने गोमाता पुजन व नैसर्गिक शेती परिसंवाद

 

वैभववाडी
 


      वैभववाडी येथील मांगवली गावात भाजपा किसान मोर्चाच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते गोमाता पुजनाने झाला. त्यानंतर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.या कार्यक्रमासाठी अभियानाचे संयोजक सिंधुदुर्ग भाजप उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, वैभववाडी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदिप रावराणे, किसान मोर्चा सरचिटणीस गुरुनाथ पाटील, किसान मोर्चा सरचिटणीस महेश संसारे, तालुका सरचिटणीस रितेश सुतार, संजय सावंत, वैभववाडी किसान मोर्चा मंडळ अध्यक्ष अवधूत नारकर, यशवंत पंडीत, अनंत नेवरेकर, विनोद आयरे, विलास वळंजू, सूरज तावडे, शिवाजी नाटेकर, मंगेश कदम, सुप्रिया तांबे, नेहा माईनकर, सुंदरी निकम, प्रदीप मोरे, प्रथमेश कोलते, उदय सावंत, अशोक गुरव, दिनेश सुतार, संजय सावंत, रोहित रावराणे, आनंद गावडे, शैलेश जामदार, गंगाराम आडुळकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
       यावेळी महेश सावंत यांनी गोमाताचे नैसर्गिक शेती मधील महत्त्व विषद केले. उमेश सावंत यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती दिली.यानंतर प्रसन्ना देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केंद्र व राज्य शासनाने केलेल्या महिला धोरणा संबंधी माहिती उपस्थितांना दिली. यावेळी बोलताना देसाई यांनी किसान मोर्चा करत असलेल्या जिल्ह्यातील कामांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. कार्यक्रमाच्या शेवटी महेश संसारे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.